लातूर : लातूर बाजार समितीत सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल दिवसभरात 8 हजार 702 क्विंटल तुरीची आवक झाली.
सध्या बाजार समितीत 6 हजार 166 रुपये कमाल तर 5 हजार 521 रुपये किमान भाव तुरीला मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव पडण्याची भीती व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लातूर बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. काल दिवसभरात 8 हजार 702 क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
तर 6 हजार 166 रुपये कमाल आणि 5 हजार 521 रुपये किमान भाव तुरीला मिळतो आहे. त्याशिवाय हरभऱ्याला 4 हजार 400 रुपये भाव मिळत असून सोयाबीनलाही बाजार समितीत चांगला भाव मिळत आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात 4 हजार 400 रुपये भाव सोयाबीनला मिळाला होता. सरकारने सोयाबीनला 3 हजार 870 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे.
मात्र लातूरच्या बाजार समितीत यापेक्षा जास्त भाव मिळू लागल्याने शेतकरी गर्दी करु लागले आहेत. राज्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
सध्या नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. आवक सर्वसाधारण असली तरी दर मात्र वाढले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत अकोला, नांदेड, लातूर, जालना, अकोला, जळगाव बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली आहे.
लातूर बाजार समितीमध्ये मंगळवारी (19 जानेवारी) तुरीची पाच हजार 20 क्विंटलची आवक होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार 726 क्विंटल तुरीची आवक होती.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 576 क्विंटल तुरीची आवक होती. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची 18 क्विंटल आवक झाली होती.
तुरीचे दर (रुपये/क्विंटल)
शहर – दर (किमान/कमाल)
लातूर – ५७२५/६२२५
अकोला – ४५००/६१५०
जालना – ५३००/५९५०
जळगाव – ५२००/५६५०
नांदेड – ५७००/५८५०
तुरीच्या भाव 50-100 रुपये फरक पडू शकतो. बाजारात येणारी तूर मागच्या दोन दिवसात होणारे चढ उतार शेतकऱ्यांच्या नुकसान करू शकतात असे काही शेतकर्यांनी सांगितले.