Crime News : ग्रामीण भागात साडूच्या भरवश्यावर बायको सोडू नये अशी म्हण आहे, कारण त्यात धोकाच अधिक होण्याची शक्यता असते या अर्थाने ग्रामीण भागातील म्हण असली तरी याला दुजोरा देणारी घटना घडली आहे.
आपल्या बायको आणि साडूच्या अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या एका शेतमजुराने कुऱ्हाडीने दोघांची हत्या केली आहे. ही घटना सफाळे गावात घडली आहे.
त्याचा संताप येऊन कुऱ्हाडीने त्या दोघांवरही वार केले. ते दोघंही या हल्ल्यात ठार झाले. त्यांची हत्या केल्यानंतर दिलीप त्यांच्या मृतदेहांशेजारीच बसून होता.
काही तासांनी जेव्हा त्याचा शेजारी त्याच्या घरी आला, तेव्हा त्याने हे भयंकर दृश्य बघून पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दिलीपला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.