मुंडे समर्थक आक्रमक | 400 ते 500 कार्यकर्ते घेणार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

794
Pankja_Gopinath_Munde

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला असून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा मोदी सरकारला विसर पडला आहे का? असा सवाल मुंडे समर्थक करीत आहेत.

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणे अपेक्षित असताना त्यांना जाणीवपूर्वक डावलले गेले असल्याचा आरोप समर्थक करीत आहेत. संपूर्ण राज्यातील मुंडे समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत.

गोपीनाथ मुंढे - पंकजा मुंडे

मोदी सरकारच्या निर्णया विरोधात ‘मुंडे समर्थक’ आक्रमक झाले असून मुंडे समर्थकांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू आहे. उद्या 400 ते 500 मुंडे समर्थक पंकजा ताईंना भेटून मोठा निर्णय घेतील, अशी माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे सध्या दिल्लीत आहेत आणि कार्यकर्त्यांनी प्रीतम मुंडे यांना भेटण्यास सुरवात केली आहे. पंकजा मुंडे उद्या दिल्लीहून आल्यानंतर हे कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेतील, अशी माहितीही मिळाली आहे.

राजीनामा सत्र सुरू

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न दिल्याने मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी राजीनामा दिला आहे.

भाजपाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुस्के यांना आपला राजीनामा सादर केला असला तरी अद्याप राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

pritam mundhe

बीडमधील पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामा दिला आहे. एकूण 36 जिल्हा परिषद सदस्यांनी व पंचायत समिती सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तर आज 70 लोक राजीनामा देण्यास तयार आहेत.

पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

गोपीनाथ मुंडे यांनी अनेक राजकीय कार्यकर्त्यांना संधी दिली, त्यांचे त्यांच्यावर प्रेम आहे. मुंडे कुटुंबावर हजारो कार्यकर्ते प्रेम करतात.

त्यामुळे समर्थकांमध्ये असंतोष असेल हे मी नाकारू शकत नाही. तथापि, माझ्या मनात किंवा माझ्या कुटुंबात अशी कोणतीही नाराजीची भावना नाही, असे पंकजा यांनी स्पष्टीकरण दिले होते.

राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून मुंडे कुटुंबाला दूर सारण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते, यावर काय मत आहे असे विचारले असता पंकजा म्हणाले, “मला तसे वाटत नाही.

मुंडे साहेबांचा प्रभाव फक्त मराठवाडा आणि महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक भागात आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मुंडे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा मला वाटत नाही आणि जर तसे प्रयत्न केले जात असतील तर त्यांचा प्रभाव वाढेल असेही वाटत नाही.

खऱ्या ओबीसींच्या नेत्यांवर अन्याय

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी भाजपचा मूळ ओबीसी नेत्याची उपेक्षा केली जात असल्याची टीका केली आहे.

भागवत कराड हे ओबीसी आणि वंजारी समाजातील आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता.

मात्र, मुंडेच मंत्रिमंडळात नसल्याबद्दल शेंडगे यांनी टीका केली आहे. कालपर्यंत संभाव्य मंत्र्यांच्या शर्यतीत प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते.

मात्र, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांची अचानक मंत्रीपदी नियुक्ती केल्याने ओबीसी समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

Also Read 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here