औरंगाबाद : राज्यात पुन्हा कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (The Outbreak of Corona Any Time in Marathwada)
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो असे म्हणत सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
बीड, नांदेड आणि लातूरबाबत त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सुनील केंद्रेकर यांनी मराठावाड्यातील पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अॅलर्ट राहा, कोरोना रोखण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच दिले आहेत.
याच दरम्यान औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकणार असल्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खासकरून बीड, नांदेड आणि लातूरबाबत त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सुनील केंद्रेकर यांनी मराठावाड्यातील पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अॅलर्ट राहा, कोरोना रोखण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच दिले आहेत.
सुनील केंद्रेकर यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप 11 मिनिटं 19 सेकंदाची आहे. या क्लिपमधून ते अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.
क्लिपमध्ये रातकिड्यांचा आवाज येत असल्याने केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांशी रात्री संवाद साधल्याचं दिसत आहे. या संपूर्ण 11 मिनिटे 19 सेकंदाच्या क्लिपमध्ये त्यांचा एकतर्फी संवाद सुरू आहे. ते एकटे बोलत असून संबंधितांना सूचना देत आहेत.
त्यांचे बोलणे सुरु असताना एकाही अधिकाऱ्याने त्यांना प्रश्न विचारलेला नाही किंवा त्यांच्या बोलण्याला हुंकारही दिलेला नाही. या क्लिपमधून केंद्रेकर कोरोनाचा उद्रेक होण्याच्या भीतीने चिंतेत दिसत आहेत.
त्यामुळे अधिकाऱ्यांना सूचना देतानाच मध्येमध्ये अधिकाऱ्यांवर भडकताना दिसत आहेत. ज्या जिल्हाधिकाऱ्यांची कामगिरी अत्यंत टुकार झाली आहे, त्यांनाही ते झापताना दिसत आहेत.
एकूणच या संभाषणावरून मराठवाड्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ शकण्याची भीती व्यक्त होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना एकूण चार सूचना दिल्या आहेत.
कोचिंग क्लासेसल नोटिसा द्या
सध्या जे कोचिंग क्लासेस सुरु आहेत तिथेही रेड करा. फाईन लावा आणि मुलांनी मास्क लावलेत की नाही पाहा. सॅनिटाईजेशनची व्यवस्था आहे की नाही ते बघा आणि त्या सगळ्यांना नोटीस द्या.
सेकंड टाईम सापडल्यावर कोचिंग क्लासेसला सील कराव्या लागतील. बाकी ज्या क्लोज्ड स्पेसेस आहेत. तिथेही ताबडतोब कारवाई करा, हे अर्जंट आहे. कारण सडनली स्पाईक होईल असे सध्या दिसत आहे.
काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नवीन स्ट्रेन आला आहे, ते नाही म्हणत आहेत. पण मला काही ठिकाणी आढळले आहे. नवीन स्ट्रेन आल्याचे दिसून आले आहे.
हिंगोली, परभणी कलेक्टरला माझ्या सूचना आहेत की, तुमच्याकडचे मला फिडबॅक येत आहेत. तुमच्या जिल्ह्यात मोठमोठे विवाह सोहळे होत आहेत आणि काहीही कारवाई केली जात नाही.
औरंगाबदामध्येही तीच परिस्थिती आहे. लग्न होतात आणि सर्व झोपा काढत आहेत. मला त्यावर इमिजेट अॅक्शन पाहिजेत, असे फर्मान त्यांनी बजावले आहे.
मंगल कार्यालयांना नोटिसा पाठवा
तुमच्या संध्याकाळच्या भिशीच्या अनुषंगाने सर्व सूचना लक्षात घ्या. नंबर एक. सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा.
जर तिथे बिना मास्कचे आणि अलाऊड संख्येपेक्षा जास्त लोकं असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे. फाईन लावला पाहिजे आणि पोलीस केस दाखल करू म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे.
सेकंड टाईमला मंगलकार्यालय पुन्हा हाऊस फुल सापडले तर गुन्हा दाखल करा आणि हे मंगल कार्यालय सील करा, असा आदेशच केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
कोविड टेस्ट बंधनकारक करा
सर्व डॉक्टरांना लिखित स्वरुपात वॉर्निंग द्या की, कोणत्याही रुग्णाला फ्लू टाइप लक्षणे असल्यास किंवा कोविड टाईप लक्षणं असल्यास टेस्ट करण्यास कंपल्सरी असेल.
यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या अनुषंगानेही काही सूचना केल्या आहेत. “खासगी डॉक्टरांकडे रुग्ण जात आहेत. सर्दी खोकला, ताप आणि फ्लू टाइप लक्षणे घेऊन हे रुग्ण जात आहेत आणि खासगी डॉक्टर त्यांना टेस्ट सजेट करत नाहीत.
नॉर्मल फ्लू आहे… नॉर्मल फिवर आहे म्हणून रुग्णाला घरी पाठवायणं चुकीचं होईल. पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तो आयसोलेट झाला पाहिजे, अशी स्पेसिफिकली डॉक्टरांना वॉर्निंग द्या, असे आदेशच त्यांनी दिले आहेत.
तर लॉकडाऊन लावावा लागेल
बिना मास्क फिरल्यास दंड केला जाईल, अशी मीडियांच्या माध्यमातून प्रसिद्धी द्या. काही ठिकाणी पेशंट आणि सर्दी पडसे किंवा फ्लू टाइप लक्षणे असलेली लोकं फिरली विदाऊट प्रोटेक्शन तर त्यांच्यावर एपिडेमिक एक्ट खाली स्प्रेड केले म्हणून गुन्हे दाखल होतील.
तुम्ही तुमचा एसपी, सीईओ आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अशा तिघांनी मिळून कृपा करून मोठ्या प्रमाणावर मीडियात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नागरिकांना वॉर्निंग द्या.
लॉकडाऊन कडक स्वरुपाचा लावावा लागेल. तसेच लोकांना स्वत:हून बाहेर यायला सांगा. लोक बाहेर आले आणि ते अर्ली पेशंट असेल तर प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर होम आयसोलेशनचा विचार करू अन्यथा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्येच उपचार होईल हे लक्षात घ्या, असं लोकांना सांगा”, असे आदेशही त्यांनी दिले.
जर नियम पाळले नाही तर मास्कचे दंड मोठ्या प्रमाणावर चालू राहिल असं स्पष्ट करा. तुमच्यासोबत पोलिसांना इन्व्हॉल्व करा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ५० टक्के दंडाची रक्कम पोलिसांकडे वर्ग करा आणि ५० टक्के तुमच्या लोकल इन्स्टिट्यूशनकडे ठेवा. लोकांना वॉर्निंग द्या की ही परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावावा लागेल.
सीसीटीव्ही तपासा
यावेळी त्यांनी मराठवाड्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेशही दिले. “काही सीसीटीव्ही बंद झाले असतील तर त्याचा आढावा घ्या.
कोणते कोणते बंद झाले, ते पाहा आणि त्याचं प्री प्लानिंग करा. तसेच व्हेंटिलेटर सुरू आहे की नाही डॉक्टरांना दिलेल्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत की नाही याकडे लक्ष द्या”, असं त्यांनी सांगितले आहे.
सेकंड व्हेव येणार
लक्षात ठेवा पुन्हा सेकंड व्हेव फार मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. भारतात अनेक ठिकाणी 200, 400, 500 च्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणा करू नका.
त्याच त्या सूचना ज्या मागच्या वर्षी दिल्या टेस्टिंग करा, तपासणी करा, आरटीपीसीआर जास्त करा, हे बोलायला लावू नका”, अशी तंबीही त्यांनी दिली.
लातूर, बीड, नांदेडची काळजी
मला लातूर, बीड आणि नांदेडची काळजी आहे. परभणीच्या सिव्हिलची टेस्टिंग वगैरे फार बोगस आहे. मी त्यावर बिलकूल समाधानी नाही. हिंगोलीचं टेस्टिंग तर अत्यंत पुअर आहे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या.
ट्रेसिंगकडे लक्ष द्या. त्याच त्या सूचना बोलायला लावू नका. सीईओनी यात पुढे आले पाहिजे. यात मी म्युनिसिपल कमिशनरलाही जबाबदार धरणार आहे.
बी अलर्ट मिशनरी आता पुन्हा टोनिंग करा आणि तुमचा रिस्पॉन्स टोनअप करा. पुन्हा या विषयावर वेगळी व्हिसी घेण्याची माझ्यावर वेळ आणू नका.
आपण महिना दीड महिना टाईट राहिलो तर माझा अंदाज आहे की, बाय जून जर आपल्या स्वत:ला वाचवू शकलो तर ठिक नाही तर पुन्हा उन्हाळ्याचे तुमचे सर्व महिने याच तापात जातील.
व्हीसी होतील. स्ट्रॅटिक्स होईल, आढावे होतील आणि मग प्रॉब्लेम होतील. ती वेळ येऊ देऊ नका आणि कामाला लागा”, असंही त्यांनी म्हटलं आहे.