मुंबई: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा दिला आहे.
राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाला 15 टक्के फी कपातीच्या आदेशास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
राज्य सरकार लवकरच यासंदर्भात अध्यादेश काढणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काढण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयानेही फी कपातीबाबतचे आदेश दिले होते. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ज्या पालकांचे पाल्य खासगी शाळेत शिकतात, त्यांना मोठा दिलासा मिळाला.