मुंबई : शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन राज्य सरकारतर्फे त्यावर तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र देखील लिहिले आहे.