लातूर जिल्ह्यात दुचाकीवरील रक्कम पळवणारी टोळी सक्रिय आहे. जिल्ह्याती तीन ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये तब्बल 4 लाख 50 हजार रुपये पळवण्यात आलेले आहेत.
निलंगा शहरातील राघो ट्रेडिंग कंपनीजवळ मोहन सदाशिव चवनहिप्परगे (रा. लोंढेनगर, निलंगा) यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख रुपये पळवून नेले. अज्ञात दोघांविरुद्ध या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा येथील एसबीआय बँकेजवळ फिर्यादी शेख महेबुब चाँदसाब रा.नागरसोगा ता. औसा यांनी एसबीआय बँकेमधून 2 लाख रुपये काढले होते. सदरील रक्कम आणि इतर कागदपत्रांची बॅग त्यांनी मोटारसाकलला अडकवली होती.
लातूर शहरातील चंद्रनगर भागामध्ये महेश शहाजीराव साळुंके (रा. खाडगाव) याच्या जवळ येऊन चोरट्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे सांगून दुचाकीला त्यांनी लावलेली पिशवी पळवली.
पिशवीमध्ये 50 हजार रुपये, हिशोबाचे रजिस्टर, कॅल्यूलेटर होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.