वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत : राज्यमंत्री संजय बनसोडे

460
Sanjay Bansode

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गतच्या जुन्या मंजुर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यात यावी तसेच ही कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज दिले.

उस्मानाबाद येथील उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयाता पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव श्री. हजारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उस्मानाबाद येथील कार्यकारी अभियंता यांच्यासह मुरुम नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, वाढीव पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीही काढण्यात आली असून ही योजना लवकरच पूर्णपणे कार्यान्वित करुन लेखाबंद करण्यावर भर देण्यात यावा.

उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा येथील मुरुम येथील वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाच्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपची किंमत वाढल्यामुळे तसेच इतर भाववाढीमुळे या योजनेचा खर्च वाढला आहे.तथापि योजनेमध्ये उद्भवाच्या बेनीतुरा धरणावरील अंशदानाचा समावेश होता ज्याची रक्कम सुमारे 4.50 कोटी होती.

दरम्यान जलसंपदा विभागाकडून हे अंशदान रद्द करुन मुरुम नगरपरिषदेवरील बोजा कमी करण्याबाबतची सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे योजनेवर वाढीव खर्च न होता मंजुर रक्कमेमध्येच योजना पूर्ण होईल आणि मुरुम नगरपरिषदेवर आर्थिक बोजा पडू नये तसेच अंशदान रद्द करण्याबाबत आपण स्वत: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here